Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे
पाथर्डी:विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शालेय जीवन म्हणजे खेळणे,बागडणे आणि शिक्षण घेऊन सुसंस्कृत होऊन समाजात बाहेर पडणे.अशातच दहावी पर्यंत ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेला सोडून जाणे म्हणजे मित्रांसोबत व शिक्षकांसोबत जुळलेले ऋणानुबंध तोडून जाताना सर्वांचे डोळे भरून येतात.अश्याच काहीशा वातावरणात चिंचपूर पांगुळ ता.पाथर्डी. जि.अ.नगर येथील एकलव्य शिक्षणसंस्थेचे श्रीवामनभाऊ विद्यालयात इयत्ता दहावीच्या (एस.एस.सी.) विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.यावेळी custom softball jerseys adidas buty yung 1 sobretudos outlet Portugal camicia leggera donna shopper bag kozena rok met stippen zara adidas women s soccer tiro 17 training pants black nike cap ebay اسعار كاميرات dslr pull femme rose fushia pánská bunda kappa vasil set tassen amazon sac lonchant μπαταρια iphone εγγύηση 302 κυκλουσ denon dvd 1940मीरा बडे,वैशाली आघाव,शिवनाथ बडे,पत्रकार सोमराज बडे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. तर प्रमुख पाहुणे यांचा सत्कार मुख्याध्यापक नरोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी शाळेतील अनुभव व शिक्षकांप्रती असलेले अनुभव,व आपले विचार प्रगट केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक पालक संघटनेचे अध्यक्ष गणेश तात्याबा बडे हे होते. याप्रसंगी बोलतांना मुख्याध्यापक संजय नरोडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी एक सुसंस्कृत नागरिक म्हणून येथून बाहेर पडावे.आईवडीलाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सतत करत रहावे.व भारत मातेची सेवा तुमच्या हातून घडत रहावी.
यावेळी श्री घुले, कुदळ, चौधर,ढाकणे,दहिफळे, डॉ.संजय उदमले,आदी शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. गणेश बडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना शुभेच्छा देवून परीक्षेच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारी व परीक्षेच्या तयारी बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन श्री कुदळ यांनी केले तर आभार घुले सर यांनी मानले.