एम. एम.नि-हाळी विद्यालयात “लेखक / कवी आपल्या भेटीला” उपक्रम साजरा.
सोमराज बडे,पाथर्डी : इयत्ता आठवीतील “गोधडी” या कवितेचे लेखक डॉ. श्री.कैलासजी दौंड यांनी विद्यालयास आज भेट दिली. त्यांनी त्यांच्या अतिथी भाषणामध्ये गोधडी कवितेतील अनेक पैलू उलगडून विद्यार्थ्यांसमोर मांडले.
“गोधडी” फक्त चिंध्यापासून बनवलेली नसते , तर त्यातून मिळणारी मायेची ऊब महत्त्वाची असते. गोधडी विणताना चिंध्या सुद्धा अनेक आठवणींना उजाळा देत असतात. गोधडी कविता लिहिण्यामागची व्यथा सुद्धा त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांसमोर मांडली.
तसेच वाचनाने माणूस घडतो असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांनी सदर कविते संदर्भात आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारून त्यांच्याकडून यथोचित उत्तरे मिळवली. सदर कार्यक्रम काव्यमय वातावरनात पार पडला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री .संजय घिगे , विश्वस्त श्री. श्रीकांत नि-हाळी , श्री.विठ्ठल दहिफळे सर, श्री,गणेश सरोदे , प्रा. जनार्दन बोडखे, श्री अजय भालेराव ,सौ.भाग्यश्री वाकडे ,श्रीमती भारती सोलाट, श्रीम. मिनाक्षी चिपाडे मॅडम , सौ. सुरेखा वाघमोडे. आदींसह शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विठ्ठल वारकड यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार श्री गणेश सरोदे यांनी मानले.