Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर – इसळक गावातील ज्येष्ठ महिला व्यक्तिमत्त्व तुळसाबाई सुखदेव गेरंगे यांचा बुधवारी (दि.११) रात्री १ च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या.
तालुक्यातील हाडांचे वैद्य आणि माजी पोलीस पाटील सुखदेव गेरंगे पाटील यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच इसळक निंबळक सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी गेरंगे यांच्या मातोश्री असून सरपंच संजय गेरंगे यांच्या त्या चुलती होत्या. शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील गेरंगे यांच्या त्या आजी होत्या.
स्व: तुळसाबाई परिसरात ‘काळूबाई’ नावाने सर्वपरिचित आहेत. त्या प्रेमळ सुस्वभावी होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून पडल्या होत्या. अखेरीस हा संघर्षमय प्रवास आज थांबला. त्यांच्या जाण्याने इसळक-निंबळक परिसरातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तुळसाबाई गेरंगे यांचे वृद्धापकाळाने निधन
RELATED ARTICLES