Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर – अफवांवर विश्वास ठेवू नका,सावध रहा..सतर्क रहा… परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
काही टोळ्या मुलांना उचलून नेत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर काही लोकांकडून पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका. परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्ष अहमदनगर ०२४१-२४१६१३२ अथवा हेल्पलाईन ११२ डायल करा. कायदा हातात घेऊ नका, तसे झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही श्री पाटील यांनी सांगितले आहे.